स्वयंपाक हि कला आहे. स्वयंपाक आता फक्त महिलाच करतात असे नाही. बऱ्याच पुरुषांना सुद्धा स्वयंपाक करायला आवडतो. सध्या बरेच जण विविध प्रकारच्या गोष्टीत एकत्र करून नवीन पदार्थ करण्याची रीत सुरू जाळी आहे. रोज स्वयंपाक करणारे व्यक्ती कितीही पटाईत असले तरी त्याच्या हातून चूक होणार नाही असे नाही. उदाहरणात काही वेळेस मीठ जास्त पडणे, काहीवेळेस तिखट जास्त होणे. तेल कमी जास्त होणे इत्यादी. अशा प्रकारच्या चुका आपल्या हातून धून मधून होत असतात.
पण काळजी करण्याची गरज नाही. आज आपण अशा काही किचन टिप्स पाहणार आहोत. ज्यामुळे तुमच्या हातून जय काही छोट्या मोठ्या चुका होतात त्या होणार नाही. आजच्या लेखात आपण अशा काही महत्वपूर्ण किचन टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही तयार केलेले सर्व पदार्थ उकृष्ट तर होणारच शिवाय तुमच्या हातून होणाऱ्या चुका सुद्धा कमी होतील.
10 महत्वपूर्ण किचन टिप्स
नसलेल्या दुधाचे पाणी फेकून देऊ नका.
जव्हा तुम्हला पनीर बवायचे असते अशा वेळी तुम्ही दूध नासवतात. आणि त्यातील पाणी काढून टाकतात आणि पनीर बनवता. जे काही उरलेले पाणी फेकून देत असताल तर चुकीचे आहे. हे पाणी तुम्ही पीठ मळण्यासाठी वापरू शकता यामुळे पराठे किंवा चपाती मऊ आणि चागल्या प्रकारे बनते.
रस्सा भाजीत जास्त झालेले मीठ अशा पद्धतीने कमी करा.
घरात आपण रस्सा भाजी करो. काही वेळेस त्यात मीठ जास्त पमाणात पडले जाते अशा वेळी आपण कणकेचे छोटे छोटे तीन ते चार गोलाकार गोळे करावे आणि या रस्सा भाजीत टाकावे. आणि जया वेळेस हि भाजी तुम्ही वाढणार असाल त्या वेळेस हे सर्व गोळे काढून घ्या. यामुळे तुमच्या रस्सा भिजत झालेले मीठ कमी होईल.
सुखी भाजीतील मीठ कमी असे करायचे.
अप रस्साभाजीतील मीठ असे कमी करायचे याबद्द जाऊन घेतले. जर का सुकी भाजी तुम्ही केली असेल आणि जर का त्यात मीठ जास्त झाले असेल तर काय करावे असा प्रश्न येत असेल. जर का सुकी भाजीत मीठ जास्त झाले असेल तर त्यात एक ते दोन चमचे बेसन टाकून मिक्स करा यामुळे जास्त झालेले मीठ जाणवणार नाही.
भाजीत तिखट जास्त झाले तर.
काही वेळेस आपण भाजी तयार करताना त्यात जास्त प्रमाणत तिखट पडले जाते. असा वेळी आपण त्यात दूध कविता दही टाकून शिजवा यामुळे काही काही प्रमाणत जास्त झालेले तिखट कमी होईल.
डाळेच्या वड्या जास्त काळ कशा साठवून ठेवाव्या.
मसूरच्या डाळीत काही प्रमाणत किडे होतात. याच्या वड्या आपण तयार करून ठेवल्या तर त्या सुद्धा खराब होण्याची शक्यता असते. अशा वेळी या वड्या तेलात तळून घ्यावे आणि बंद डब्यात झाकून ठेवावे.
योग्य मार्ग नूडल्स आणि पास्ता शिजवण्याचा
बऱ्याच वेळेस आपण नूडल्स आणि पास्ता एकमेकांना चिकटलेला पहिला असेल. एकमेकांना चिटकूनये या साठी गरम पाण्यात थोडे मीठ आणि तेल टाकून नूडल्स आणि पास्ता उकळून घ्यावे. नंतर थंड पाण्याने धून घ्यावे जेनकुन हे एकत्र चिटकनर नाही.
भात जिवण्याची पद्धत.
पांढरा शुभ्र भात खायचा असेल तर. ज्या वेळेस भात शिजवत असतात त्या वेळेस त्यात थोडे चिमूट भर तेल आणि त्यात लिंबाचा रस टाका. यामुळे तांदळाचे दाणे चागले फुलतील शिवाय पांढरे दिसतील.
कुरकुरीत पकोडे कसे बनवायचे.
पकोडे बनवताना त्याच्या मिश्रणात तांदळाचे थोडे पीठ आणि एक ते दोन चमचे गरम तेल टाकवे आणि तर पकोडे तळावे यामुळे कुरकुरीत पकोडे तयार होतील.